महाराष्ट्र शासन

ग्रामपंचायत - दिवड

ता. माण जि. सातारा

Theme trigger
Purple
Blue Apply
Green
Green Apply

आमच्या ग्रामपंचायतीबद्दल

ग्रामपंचायत दिवड ही आपल्या गावाच्या विकास, नियोजन आणि कल्याणासाठी जबाबदार असलेली स्थानिक प्रशासकीय संस्था आहे. पंचायती राज कायद्यांतर्गत स्थापन झालेली आमची ग्रामपंचायत सरकारी योजना राबविण्यात, मूलभूत सुविधा राखण्यात आणि सर्व नागरिकांसाठी पारदर्शक प्रशासन सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

ग्रामपंचायत दिवड ही आपल्या गावाच्या विकास, नियोजन आणि कल्याणासाठी जबाबदार असलेली स्थानिक प्रशासकीय संस्था आहे. पंचायती राज कायद्यांतर्गत स्थापन झालेली आमची ग्रामपंचायत सरकारी योजना राबविण्यात, मूलभूत सुविधा राखण्यात आणि सर्व नागरिकांसाठी पारदर्शक प्रशासन सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

आमचे कार्यक्षेत्र

आमचा संघ

सौ. अर्चना सावंत

सरपंच

श्री. शिवाजी सावंत

उपसरपंच

श्री. तानाजी गंबरे

ग्रामपंचायत अधिकारी

सदस्य

ग्रामपंचायत - दिवड

तालुका : माण | जिल्हा : सातारा
सरपंच निवडणूक दिनांक : 2022 | कार्यकाळ समाप्त : 2027

क्र.नावपदसंपर्क क्रमांक
1 सौ. अर्चना संजयकुमार सावंत सरपंच +91-9970028867
2 श्री. शिवाजी वसंत सावंत उपसरपंच +91-7020501737
3 श्री. नवनाथ बापुराव लोखंडे सदस्य +91-9975112944
4 सौ. कुसुम अरविंद सावंत सदस्य +91-7888287617
5 श्री. सतिश पांडुरंग घुटुकडे सदस्य +91-9503237672
6 सौ. संध्या सुनिल भोसले सदस्य +91-7719017516
7 सौ. प्रियांका विनायक लोखंडे सदस्य +91-7709056934
8 श्री. जयवंत पांडुरंग सावंत सदस्य +91-9850455528
9 सौ. सावित्रा रामचंद्र सावंत सदस्य +91-7977508792
10 सौ. संतोषी शिवाजी काटकर सदस्य +91-9623838433
क्र.कर्मचारी नावपदसंपर्क क्रमांक
1 श्री. तानाजी लक्ष्मण गंबरे ग्रामपंचायत अधिकारी +91-9422007485
2 श्री. अमोल निवृत्ती पारसे संगणक परिचालक +91-9404160089
3 श्री. विश्वनाथ देवबा नामदास पाणी पुरवठा कर्मचारी +91-9623937317
4 श्री. राजेंद्र शशिकांत जाधव ग्रामरोजगार सहाय्यक +91-9921199980
5 श्री. सोपान ज्ञानू लोखंडे शिपाई +91-9767319379
आमचे ध्येय हे आहे की प्रत्येक ग्रामस्थाला सरकारी योजनांचा लाभ मिळावा, स्वच्छ वातावरणात राहावे आणि आपल्या प्रिय गावाच्या प्रगतीत योगदान द्यावे.
गावाचा विकास म्हणजे प्रत्येक घराचा विकास. चला, सर्वांनी आपलं गाव प्रगत करूया.
-सरपंचांचा संदेश

आमचा दृष्टिकोन

एक स्वच्छ, विकसित आणि स्वयंपूर्ण गाव बांधणे जिथे प्रत्येक नागरिक सन्मानाने आणि संधीने जगेल.

आमचे ध्येय

दिवड गाव हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या व शुरविरांचा जिल्हा सातारा मधून माण तालुक्यातून सातारा पंढररपूर व विटा मायणी रोड लगत असलेले 2755 एवढी लोकसंख्या असलेले गाव या गावामध्ये एकून 1355 महिला संख्या आहे दिवड गाव हे पुर्णपणे शेतीपुरक गाव असून याठिकाणी प्रामुख्याने, मका, ज्वारी, बाजरी, ऊस हि पिके घेतली जातात. परंतु व्यावसायिक दृष्टीकोणातून अधिक उत्पादन वाढवून हे गाव आता सेंद्रिय शेती व रेशीम तुती शेतीकडे वळले आहे दिवड गाव हे फौजीचे गाव म्हणूनही ओळखले जाते. या गावचे ग्रामदैवत हे म्हसोबाराया असून गावामध्ये मोठे मंदिर आहे. म्हसोबारायाच्या कृपेने व ग्रामस्थांच्या मदतीने हे गाव आदर्श गावाकडे वाटचाल करत आहे.

१ ते ४ थी पर्यंत असूनु ही पूर्ण डिजीटल शाळा आहे. हि शाळा 2023 ला जिल्हातून स्वच्छ शाळा व गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून पहिल्या क्रमांकावर आली. हि शाळा पूर्णपणे भौतिक सुविधायुक्त शाळा आहे. यामध्ये मध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान, मैदानात वृक्षारोपन, गार्डन, ओपन जिम, प्रत्येक वर्गात व शाळेच्या आवारात मुलांच्या संरक्षणासाठी CTV कैमेरे, विजप्रक्रियेसाठी सोलर मुला – मुलीसाठी विभक्त शौचालय व पिण्यासाठी शुद्ध व वॉटर फिल्टर चिलर पाणी व पोषक आहारासाठी सेंद्रिय परसबाग व स्वयंपाकगृह शाळेतील शिक्षण पद्धती हि आधुनिक असून यासाठी मुलांना लॅपटॉप, कॉप्युटर प्रोजेक्टर वरती शिक्षण दिले जाते शिक्षणाव्यतीरिक्त मुलांची आवड लक्षात घेवून मुलांना वारली पेंटींग, सुडोकू , बुध्दीबळ, कागदी पिशवी, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे पेपरलेस बँकिंग बचत, किल्ला बनविणे, चप्पल स्टैंड बनविणे अशा विविध कला शिकविण्यात आल्या.

गावामध्ये आठवड्यातून एकदा श्रमदान केले जाते यामध्ये सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, वनराई बंधारा, पाणंद रस्ते दुरुस्ती, वृक्षारोपन हि कामे श्रमदानातून केली जातात यामध्ये गावातील महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो.

महिलांना लहुउद्योग करता यावा यासाठी त्यांना कृषि व व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये शेळीपालन कुकुटपालन, मधमाशी पालन, गांडूळ खत निर्मिती व लागवड शेतीतील आधुनिक पद्धत फळझाड लागवड इत्यादी समावेश होता

या प्रशिक्षणामुळे तसेच ग्रामपंचायत व उमेदच्या माध्यमातून आज गावातील 300 महिला स्वतः चा लघुउद्योग करून स्वताच्या पायावर उभ्या आहेत. घरोघरी दुग्ध व्यवसाय करण्यात महिला अग्रेसर आहेत

गावामध्ये प्रत्येक ३ महिन्यानंतर आरोग्य तपासनी करण्यात येते. यामध्ये हिमोग्लोबीन तपासणी, ब्लड प्रेशर, रक्तातील साखर, नेत्र तपासणी, ECG, स्तन कॅन्सर तपासणी व गर्बाशयाद्वारे होणारे विविध आजार यावरील तपासनी गोदर माता तपासणी अशा सर्व गर्भाश‌याद्वारे होणारे विविध आजार या प्रकारच्या तपासण्या करून त्यांना उपकेंद्र दिवड द्वारे उपचार दिले जातात.

ग्रामपंचायतीशी महिला जोडल्याजाण्यासाठी महिला सभा, बालसभा किशोरव‌यीन मुली यांची सभा घेऊन महिलांचे प्रश्न जाणून घेतले व ग्रामपंचायतच्या माध्यमातून महि‌लांचे व मुलीचे प्रश्न मार्गी लावले यामध्ये महिलांना घरकुल, संजयगांधी निराधार, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनांचा लाभ मिळवून दिला. मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन मशिन बसविण्यात आली महिला व मुली यांच्या सुरक्षिततेसाठी गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले.

किशोरवयीन मुलीची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य उपचार देण्यात आला. गावातील इंदिरा गांधी विद्यालय याठिकाणी मुलीसाठी पिंक रूम ची व्यवस्था केली सॅनिटरी पॅड मशिन व डिस्पोजेबल मशिन बसविण्यात आली मासिक पाळीमध्ये आराम करण्यासाठी हॉस्पिटलईज खॉट व मेडीसिन सुविधा उपलब्ध करण्यात आली.

या संकल्पनेअंतर्गत गावातील सर्व महिला व किशोरवयीन मुली यांची हिमोग्लोबीन तपासनी करण्यात आली ज्या महिला व मुली ॲनिमिया आढळल्या त्यांना Iron & folic अ‍ॅसिडच्या च्या गोळ्या देणेत आल्या पोषक आहारासाठी घरोघरी सेंद्रिय पोषण परसबाग निर्मिती करून त्याचा आहारात समावेश केला. महिलांना व मुलींना पोषण आहार, मायक्रोग्रीन, सेंद्रिय परसबाग याविषयी प्रशिक्षणे देण्यात आली.

गावातील विधवा महिलांना सन्म‌ानाने जगता यावे यासाठी जुन्या रुढी, परंपरा मोडित काढल्या महिलांना सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी करुण घेतले. आज त्या आपल्या घराची जबाबदारी घेऊन खंबरिपणे व सन्मानाने समाजात वावरत आहेत.

गावामध्ये याद्वारे शेती केली जाते त्यामुळे महिला व पुरुष यांचे शेती गट स्थापन करण्यात आले. हि शेती सेंद्रिय पध्दतीने केली जाते. रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खत सेंद्रिय खत व औषध फवारणी करून कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून आज महिलांचा गट पाणी फौडेशन च्या माध्यमातून फार्मर कप साठी काम करत आहे.

गावातील महिलांना सर्व सुविधा असल्याने बाहेरगावी जावे लागत नाही यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सोसायटी पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, पाण्यासाठी जलजिवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल योजना प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन, वॉटर एटीएम सुविधा, रेशन वितरण दुकान, सार्वजनिक महिला शौचालय या सर्व सुविधा पोचवण्यात आल्या.

गावामधून एकुण 11 कुटुंब हा व्यवसाय करत आहेत या कुटुंबातील महिला हा व्यवसाय करून उद्योगी बनल्या आहेत यासाठी सेंद्रिय तुती लागवड व रेशीम कोष निर्मिती व कोष वितरण व्यवसाय करत आहेत या माध्यमातून गावातील इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.

गावात ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून पारंपारिक सणांचे आयोजन केले जाते. परपरागत असलेले आपले सण है आधुनिक युगात लुप्त होत चालले असताना महिलांना व मुलींना सणांविषयी आपुलकी, माहिती व आनंद मिळावा यासाठी है, सण नव्याने चालू करण्यात आले यामध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रम रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, इत्यादी स्पर्धांचे चे आ‌योजन करून विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांचा गावातील कार्यक्रमामध्ये सहभाग वाढला. गावातील महिला व मुली सक्षम बनल्या.

गावच्या सरपंच या लोकनियुक्त सरपंच आहेत. ग्रामपंचायत बॉडी ही 9 ची आहे. सरपंच अर्चना संजयकुमार सावंत या महिला असल्याने व ग्रामपंचायत बॉडीमध्ये महिला सदस्य संख्या जास्त असल्याने गावातील महिला स्नेही वातावरण निर्माण झाले ग्रामपंचायत दिवड ही गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटीबध्द आहे

गावांमध्ये परंपरागत आलेल्या रूढी परंपरा व प्रथा मोडीत काढून गावातील ज्या महिलांचे प्रति मृत्यू झाले आहेत अशा महिलांना हळदी कुंकवाचा मान दिला व शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला.

किशोरवयीन मुलींसाठी पिंक रूम बनविण्यात आली यामध्ये महिला व मुली यांच्यासाठी सॅनिटरी पॅडची व्यवस्था करण्यात आली गावात उपकेंद्र या ठिकाणी महिलांसाठी सॅनिटरी मशीन उपलब्ध करून दिली.

दिवड 1 ते 17 मुद्दे माहिती

No Information PDF uploaded yet.

Scroll to Top